Tuesday 31 May 2011

आठवते का तुला?

आपली नवीन ओळख झाली होती
फोनवर तासन् तास गप्पांची साथ होती......
आठवते का तुला?
आपण पहिल्यांदा भेटायचे ठरवले
एकमेकांना पहिल्यांदा पहायचे ठरवले......

आठवते का तुला?
आपलं पहिल्यांदा समुद्रकिनारी भेटणं
एकमेकांची नजर चुकवुन एकमेकांना न्याहाळणं......
आठवते का तुला?
माझ्या मनातलं गुपित मी सांगितलं
तू पण प्रेम करतेस माझ्यवर हे जाणवले......
आठवते का तुला?



त्यानंतरचं आपलं वारंवार भेटणं
थोड्याशाही विरहाने आपलं अगतिक होणं
किती स्वप्नवत होते ते दिवस
सदा तुझ्याच विचारांत असे हे मन
आज तू ही तूच आहेस
आणि मी ही मीच आहे
माझ प्रेम ही अगदी तसंच आहे
किंबहुना ते तू विसरली असशील
आज आपल्यामध्ये काहीही नसेल


शरीराने दूर असली तरी मनाने आहे जवळ
चूक तुझीही नाही, करियरचा चिंताच तुंबळ
खुप समजावलं वेड्या मनाला, सर्व परत नीट होईल
वेळात वेळ काढून, ती तुला भेटायला येइल
मनाला आवर घालणं नाही ग जमत मला
सारखं रागावून त्रास नसतो द्यायचा तुला
समजून घे ग मला.....
वाटेकडे डोळे लावून तुझ्या
विचारांत असतो फक्त तुझ्या
प्रत्यक्षात नाही जमलं तर
स्वप्नांत तरी येशील ना माझ्या?

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
काल तिच्या सोबत चालत होतो...
चालता चालता बोलत होतो...
बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

नविन बुटामुले पाय दुखत होता...
चालता चालता हाडाला खुपत होता...
तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!


काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली
आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी....
का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

होटेलात गेलो.......खुप खल्ल
उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलं
का तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........
घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....
बसस्टॉप येताच मी थाम्ब्लो
तेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिले

काही क्षण स्तब्ध झालो........आम्ही
एकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालो
कोणास ठाउक........का ते कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

-- 

Sunday 29 May 2011

शून्यातही तुला विसरणारा मी नाही

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही


थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले


जीवनाच्या मॆफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले.........


तुझ्याच त्या स्मितहास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते.....
साकारलेल्या त्या भावनांना
का आज शब्दच नाहीत??
का आज त्या डोळ्यांमध्ये
माझी एक ओळखही नाही


-- 

महाराष्ट्र दर्शन

नाशिक
नाशिक देवळांचे शहर 


स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणजे नाशिक. हे शहर देवळांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक काळापासून नाशिकला धार्मिक स्थळ म्हणून महात्म्य प्राप्त झाले आहे. 

देशात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी दक्षिण भारतात नाशिक व त्र्यंबकेश्वर ही ठिकाणे आहेत.दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट पाहण्यासारखे आहेत. 

येथील प्रसिध्द ठिकाणे- ‍

1. त्र्यंबकेश्वर 



हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात ते वसले आहे. मुख्य ज्योतिर्लिंगाचे मंदिर पहाण्यासारखे आहे. त्याच्या चारही बाजूंनी कोट आहे. पूर्वेला मुख्या दरवाजा आहे. ब्रम्हा, विष्णू व महेशाची तीन लिंगे हे येथील वैशिष्ट्य आहे. 

मंदिराजवळच कुशावर्त तीर्थ हे कुंड आहे. मंदिरालालागूनच अहिल्या नदी वाहते. ब्रम्हगिरी पर्वतावरच गंगाद्वार हे ठिकाण आहे. येथे गोदावरी उगम पावते. त्याच्यावर ब्रम्हगिरीला जाण्याचा रस्ता आहे. तेथे भगवान शंकरांनी जटा आपटल्याच्या खूणा असल्याचे सांगितले जाते. 

कुशावर्त तीर्थ  कुंड


त्र्यंबकेश्वर वारकरी भक्तांसाठीही महत्त्वाचे टिकाण आहे. कारण ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथांना येथेच गहिनीनातांचा अनुग्रह झाला होता. त्यांची समाधीही येथेच आहे. तेथे मोठा उत्सवही साजरा होतो. शिवाय कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या तेरा पैकी दहा आखाड्यांचे आश्रम येथे आहेत. 






त्र्यंबकेश्वरात बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी तर लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारण्याची परंपरा आहे. विशेषतः तिसर्‍या सोमवारी त्यासाठी मोठी गर्दी असते. हे स्थळ नाशिकपासून २७ किलोमीटरवर आहे.

2. पंचवटी- 







त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली गोदावरी नदी नाशिकमधून वाहते. या नदीमुळे नाशिकचे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पलिकडील भागाला पंचवटी म्हणतात. पंचवटी भागातच रामाचे वास्तव् होते असे मानले जाते. येथे असलेल्या पाच वडांच्या झाडांवरून या भागाचे नाव पंचवटी पडले. 


प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटीतच आहे. याशिवाय इतर अनेक मंदिरे येथे आहेत. पंचवटीतच सीता गुंफा आहे. या गुहेत सीता काही काळ राहिली होती, असे म्हणतात. गुहेत जायला फार छोटा रस्ता आहे. आतमध्ये राम लक्ष्मण व सीतेची मूर्ती आहे. येथूनच रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे मानले जाते.

३. रामकुंड- 

रामकुंड

पंचवटीतील हे सर्वात महत्वाचे ठिकाण. पंचवटीतील वास्तव्यात श्रीराम स्नानासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी पिता दशरथाच्या अस्थींचे विसर्जन रामाने केले. येथे अस्थिविलय कुंड आहे. तेथे विसर्जित केलेल्या अस्थी वाहून न जाता वितळतात, अशी श्रद्धा आहे. जवळच गांधी तलाव आहे. या तलाव तसेच स्मारक आहे. महात्मा गांधीच्या अस्थी येथे विसर्जित केल्या हो्त्या. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नान याच कुंडात होत असते.

४. काळाराम व इतर मंदिरे 

पेशव्यांच्य काळात त्यांचे सरदार रंगवराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बनले आहे. त्याच्याभोवती दगडी कोट असून तो १७ फूट उंच आहे. मंदिरात आत ओवर्‍या आहेत. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिरात राम सीता व लक्ष्मण यांच्या २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. 

हे मंदिर बांधण्यास १७७८ साली सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी जवळच्या रामशेज डोंगरावरून काळा दगड आणण्यात आला. हे मंदिर बांधायला तेवीस लाख रूपये खर्च आला होता. दोन हजार कामगार बारा वर्षे काम करत होते. दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. 

तो बरीच वर्षे चालला होता. काळारामाव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेली मंदिरे या परिसरात आहेत. आकर्षक कलाकुसरीसाठी नारोशंकर मंदिर प्रसिद्ध आहे. पेशव्यांनी वसईच्या युद्धात विजय मिळाल्यानंतर काढून आणलेली घंटा याच मंदिरात बसवली आहे. याशिवाय नंदी नसलेली कपालेश्वर मंदिर आहे. प्राचीन सुंदरनारायण मंदिर आहे. 

५. तपोवन

पंचवटीतच गोदावरी व नंदिनी या नद्यांच्या संगमावर तपोवन हे ठिकाण आहे. तपोवन म्हणजे तप करण्याची जागा. पूर्वीच्या काळी या भागात दोन नद्यांच्या संगमामुळे हिरवळ होती. अतिशय प्रसन्न व मनोहारी वातावरणात साधू तपश्चर्येसाठी येथे येत असत. 

रामायणकाळात लक्ष्मण येथे येत असे. त्याने शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग येथे घडला असे मानले जाते. या भागात काही गुहासुद्धा आहेत. नैसर्गिक सौंदर्यामुळे आजही पर्यटकांची येथे गर्दी असते. येथे हनुमान व लक्ष्मण यांची मंदिरेही आहेत. 

6. अंजनेरी 

हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अंजनेरी नाशिकपासून २० किलोमीटरवर आहे. या पर्वतावर जैनांची लेणीसुद्धा आहेत. गिर्यारोहणासाठी येथे असलेले सुळके प्रसिद्ध आहेत. गिर्यारोहक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच हे ठिकाण आहे. मंदिर डोंगरावर आहे. 

7. वणी- 

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथील जगदंबा देवी आहे. सप्तश्रंृग डोंगरावर हे स्थान आहे. डोंगरावर गेल्यानंतर तेथून नऊशे पायर्‍या चढून गेल्यानंर देवळात जाता येते. डोंगरातच देवीची मूर्ती कोरलेली आहे. अठराभूजा असलेली मूर्ती देखणी आहे. नवरात्र व चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. 

ही देवी अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळे या काळात मोठी गर्दी असते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येथे भक्त येतात. अनेक भक्त आपल्या गावापासून कावडी भरून आणतात. हे ठिकाण नाशिकपासून ५२.२७ किलोमीटरवर आहे. 

8.बौद्धलेणी 

नाशिक मुंबई रस्त्यावर नाशिकपासून आठ किलोमीटरवर बौद्धलेणी आहेत. (ज्याला स्थानिक भाषेत पांडवलेणी म्हणतात.) पहिल्या वा दुसर्‍या शतकात ती बांधली असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धविहार बांधण्यात आले आहे. 

9.फाळके स्मारक- 

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके नाशिकचेच. नाशिकमध्येच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे देखणे स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारण्यात आले आहे. 

१०. जिल्ह्यातील स्थळे 

नाशिकपासून तीस किलोमीटरवर असलेल्या सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. येवला हे शहर पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय १८५७च्या युद्धात पराक्रम गाजविणारे तात्या टोपे येवल्याचेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी त्याच धर्मात मरणार नाही ही घोषणा येवला येथेच केली. 

मालेगावजवळील झोडगे येथील गावी असलेले शिवमंदिर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरीजवळील टाकेद हे ठिकाण पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. सीतेला पळवून नेणार्‍या रावणाशी युद्ध करून याच ठिकाणी जटायू पक्षी निपचित पडला होता. त्याच्या स्मृत्यर्थ येथे जटायू मंदिरही आहे. 

इगतपुरी येथे सत्यनारायण गोयंका यांनी उभारलेले विपश्यना केंद्र आहे. तेथे जगभरातून लोक येतात. चांदवड येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत अनेक गिर्यारोहणासाठी योग्य अशी ठिकाणे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नाशिकहून घोटीमार्गे जाण्यास जवळ आहे. शिवाय राज्यातील सर्वांत उच्च किल्ला म्हणून गणला जाणारा साल्हेरचा किल्लाही जिल्ह्यातच आहे.

जाण्याचा मार्ग ः 
 
नाशिकला राज्यातील सर्व शहरातून येण्यास बस आहेत. शिवाय नाशिक रेल्वेमार्गावरही आहे. पुण्यापासून नाशिक २१० तर मुंबईपासून २३० किलोमीटर आहे.पंचवटी हे नाशिक शहरातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेले एक धार्मिक स्थान असून हे स्‍थळ गादावरी या नदीच्‍या काठावर आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा, रामकुंड, पेशवे यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे कोरीव दगडात कलाकुसर असलेले स्‍थळ पाहण्‍यासारखे आहे.
Posted by कैलास बधान at 8:13 PM 0 comments
Labels: महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे
महाराष्ट्रातील अभयारण्ये
अभयारण्य    जिल्हा

कर्नाळा (पक्षी)    रायगड

माळठोक (पक्षी)    अहमदनगर

मेळघाट (वाघ)    अमरावती

भीमाशंकर (शेकरू खार)    पुणे

सागरेश्वर (हरिण)    सांगली

चपराळा    गडचिरोली

नांदूरमधमेश्वर (पक्षी)    नाशिक

देऊळगाव रेहकुरी (काळवीट)    अहमदनगर

राधानगरी (गवे)    कोल्हापूर

टिपेश्वर (मोर)    यवतमाळ

काटेपूर्णा    अकोला

अनेर    धुळे
Posted by कैलास बधान at 7:49 PM 0 comments
Labels: महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्याने    ठिकाण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान    बोरिवली व ठाणे

पेंच राष्ट्रीय उद्यान    नागपूर

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान    गोंदिया

ताडोबा राष्ट्रीय उद्यान    चंद्रपूर

गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट)    अमरावती

चांदोली राष्ट्रीय उद्यान    सांगली, सातारा,

कोल्हापूर, रत्नागिरी
 महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
थंड हवेची ठिकाणे    जिल्हा

चिखलदरा    अमरावती

म्हैसमाळ    औरंगाबाद

पन्हाळा    कोल्हापूर

रामटेक    नागपूर

माथेरान    रायगड

महाबळेश्वर, पाचगणी    सातारा

तोरणमळ    धुळे

लोणावळा, खंडाळा    पुणे 

माहिती


टॅक्स
·  इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाइन कसे भरावे
·  संपत्ती कर कुठे भरावा

उद्योग-व्यवसाय सुरु करण्याविषयी
कुठे आणि कसा अर्ज करावा
·  मतदार यादीत नाव कसे दाखल करावे
·  म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा
·  रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी
·  RTI अंतर्गत माहिती कशी मिळवावी
·  कॉपीराइट साठी अर्ज
·  शस्त्र परवाना कुठून मिळवावा
·  पेटंटसाठी कुठे अर्ज करावा
तक्रारः कुठे आणि कशी दाखल करावी
शोध घ्या/पत्ता मिळवा
·  रेल्वे तिकीटची PNR स्थिती
·  पासपोर्ट अर्जाची स्थिती
·  महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे
·  संसदेचे अधिनियम
·  महाराष्ट्रातील ऑनलाइन जिल्हे
·  कृषी हवामान
·  बाळासाठी पोषक आहार
·  भारत सरकारच्या टेंडर्सविषयी
·  इंडियन एअरलाइन्स विमानांचे वेळापत्रक
·  प्रौढांसाठी पोषक आहार
·  आयुर्वेद/योग/निसर्गोपचाराविषयीमाहिती
·  न्यायालयात दाखल प्रकरणांची सद्दस्थिती
·  शरीरातील मेद
·  चोरी गेलेल्या गाड्यांची स्थिती
·  ISD Codes कसे शोधाल
·  मराठी साहित्य 

तुझी आठवण

विसरून तुला कित्येक वर्ष पालटली
हे आता आठवत नाही
तुला आठवणं सोडून दिलं की त्यांचं येणं बंद झालं
आता हे ही आठवत नाही

मी तुला विसरलोय, मी हे सुद्धा विसरलोय
स्मरणात तसं काहीच नाही .....

पण कुठे झाली ताटातूट, कुठे चुकलो रस्ता
ते मात्र आठवतंय

आणि आठवतंय की,
त्या वळणावर मी उभा होतो बराच काळ
तू गेल्यावर ही, आज सारखाच

शिवाय हे ही आठवतंय की,
या वळणावर माझ्या हातून
दिशा हरवाव्यात तशी तू हरवून गेली

गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली

तुझी आठवण २

नेहमीच येते सुखकारक आठवण ऐसे नाही
आज अशी आली की.....
आसवेड्या पापण्यांना पेलावली नाही

सोसायास्तव तयास केले
त-हेत-हेचे लक्ष प्रयत्न
सोसली नच आठवण तुझी
मग उतू गेली आसवे माझी

त्यास पुसण्या जेव्हा
शोधू लागलो माझा रुमाल
आठवले की, तुलाच
देऊ केला होता काल
काल कुठे?
त्याला उलटून गेलेत कित्येक साल

विसरावे हे ही म्हणून
माळावरची रद्दी काढत बसलो
शून्य रिकामा बसून मग
चाळू लागलो कसले कागद
तुझीच होती शब्द गोंदणे
अन नाव तुझेच खाली
उंबया पर्यंत आलेलं मन
फिरलं पुन्हा उलट्या पावली

गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली


तुझी आठवण १

गतकाळाच्या पडद्या आडून
अशी तुझी आठवण आली

जळाजळातून, कणाकणातून
नसेल जरी, तरी वाटले
अंतरातून तुझी आठवण आली

आली धावून, आतुर होऊन
उभी राहिली पसरून बहु
जरा बावरत, तरी सावरत
डुंबत डुंबत, जरा तरंगत
जशी एरवी येते अकाली,
तशी आज ही अलगद आली
इवल्या इवल्या पावलांनी
चंद्रधनुंच्या सावल्यांनी
खेळत झिम्मा, घालत फुगडी
घेत स्वताशीच फेरी
लगबगीने निघावी
नववधुच जणू माहेरी

गंधातूर वेणीत जणू,
कुणी माळव्यात जशा फुलवेली
गतकाळाच्या पडद्या आडून
तशी तुझी आठवण आली


Thursday 26 May 2011

मी अन तु


काल तू स्वप्नात आलीस् म्हणालीस !
जीवनाचे रंग आणणार होतास् तु.

गेला तो,परतलीच  नाहीस.
कसं सांगू तुला,
भौतिक ऐश्वर्याच्या बाजारात
मला तुझ्यासाठी,
काहीच होता आलं नाही.

अन् तेव्हा तूच अलगदच,
तुझ्या पाऊलखूणा माझ्यावर ठ्सवून.
पक्षांच्या थव्यांबरोबर.
दूर निघून गेलीस.

शहाणं बनून शहाण्या सारखं सगळेच जगत असतात-------


शहाणं बनून शहाण्या सारखं सगळेच जगत असतात
सुख दुःखाला आपल्या ते व्यवहारानं भागत असतात
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे
वर्षाकाळी आकाशात काळे मेघ जमणारच
वृष्टीतून सृष्टी माया आपल्यावर करणारच
पाऊस पडू लागला की शहाणी माणसं शिंकू लागतात
छत्री आणि रेनकोटच महत्त्व ते घोकू लागतात
एक वेडा गिरक्या घेत तेव्हा पावसात भिजत असतो
येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हणत असतो
पैशाच मोल शहाण्या इतकं कुणालाच कळत नसत
पण एक पैसा देऊन पाऊस घेणं त्यांना वळत नसत
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी असं वेडं बनून जगण्यात खरी मजा आहे
वसंत आपल्या कुंचल्यानं सारी सृष्टी रंगवू लागतो
जीवन गाणं कोकीळ कुहु कुहु गाऊ लागतो
गाणं म्हणल की शहाणा माणूस सरसावणारच
कुठला राग कुठली बंदिश सांगून तुम्हाला घाबरवणारच
एक वेडा तेव्हा आपल्याच नादात गात असतो
आपल्याच तालात आपल्याच सुरात न्हात असतो
गाण्याचा कायदा शहाण्या इतका कुणालाच कळत नाही
पण बेधुंद होऊन गाण्याचा फायदा मात्र त्याला वळत नाही
व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे
कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे

माय मराठी


महाराष्ट्राच्या तख्तावरती, सदैव धरिते स्निग्ध साउली,
कोण काय हो पुसता राजे, हीच आपुली माय माउली ॥
शूरवीरांची वीरश्री ही, संतमहंतांची तेजश्री
कवीवरांची ही काव्यश्री अन् वेदांची ही वेदश्री ॥
शिवरायांची ही मराठी बोली, टिळकांनी गीता रहस्यविली
भीम-फुल्यांनी बहुजनांत नेली, शाहिरांनी कवने सजविली ॥
ज्ञानियांची ज्ञानेश्वरी ही, तुकयांची ही अभंगवाणी
समर्थांचिये दासबोधे, नाथांघरी ही भरते पाणी ॥
साहित्याचा हिचा फुलोरा, अन् काव्याचा हा डोलारा
महाराष्ट्राच्या या देव्हारा, देवत्वचि जणू ये आकारा ॥
नतमस्तक मी हिच्या पाऊली, याचक मी गे तुझ्या राऊळी
गाऊ दे मला गान तुझे गे, प्रसन्न होई मराठ बोली, माय माउली ॥ 

आपल्या दोघा असा शाप का?


आपल्या दोघा असा शाप का?
पाहतो चोरून तुझा बाप का?
रोज धावतो 'दहा'चे लॅप मी
पाहताच तुला लागे धाप का?
भेटतो तेव्हा मुका मी राहतो
सूटतो पायास माझ्या काप का?
जवळ येताना असा का चेहरा?
नेहमी डोक्यात तुझ्या पाप का?
राहतो राणी तुझ्या हृदयात मी
मारते  आहेस मला तू थाप का?

येतसे स्वप्नांत माझ्या ...


येतसे स्वप्नांत माझ्या "माधुरी"ला मी वरावे
उघडता डोळे समोरी बायकोचे ध्यान यावे
जीवनावर राज्य माझ्या सासूचे अन बायकोचे
पाशवी हे बंध तोडून सांग मी कैसे पळावे
लोक का हसती कळेना पाहूनी हालास माझ्या
काय जळते आत पण हे कसे त्यांना कळावे
विसरण्या हे दुःख सारे वाटले दारू प्यावी
नेमके मी पीत असता मेव्हणीने का पाहावे
हसलो हलकेच गाली मी तिला पाहूनी तेथे
 हे आता रोजचेच आम्ही एकमेका सावरवे
झाडले प्रस्थापितांनी खोड माझी मोडण्याला
विडंबने लिहितो तरीही काय मी ह्याला म्हणावे

सगळेजन स्वार्थी अस्तात...

तीच्याकडे पाहत नुसते झुरत
एकतर्फ़ी प्रेम करन्यात काय अर्थ आहे...
जर तीला तुमच्यावर प्रेम नसेल
तर तीच्यावर प्रेम करनेही व्यर्थ आहे...

जर तुम्हाला माहीत आहे की ह्या रस्त्याचा अन्त नाही..
तर त्या वाटेला जान्यात काय अर्थ आहे...
जर कोनी त्या वाटेवरुन परत येणार नसेल
तर त्याची वाट पाहनेही व्यर्थ आहे...

मागचे सगळे वीसरुन आता शीकावे
स्वताहाचे आयुश्य जगायला...
इथे कोणालाही नसतो वेळ
कोणाबरोबर आपुलकीने वागायला...

करु नये कोणाकडुन कसली अपेक्शा
इथे सगळेजन तुमच्यासारखे नसतात...
कोण कोणाचे नसते ह्या जगात
सगळेजन स्वार्थी अस्तात...

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा
कारण प्रेमात हो किंवा नाही असते
प्रयत्नात ही नाहीतर ती असते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मागणी घालू नका प्रपोज़ मारा
कारण मागणी नंतर एकतर पती श्रीराम नाहीतर राम राम
प्रोप्से मधे लवरशिप मिळाली तर ठीक
नाहीतर फ्रेंडशिपतर असतेच असते
फ्रेंडशिप मधे काही दिवसानी का होईना पोरगी फसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मूलीना सीरियस घेऊ नका टाइम पास करा
सिरियस व्हाल तर हमखास मराल
टाइम पास कराल तर राहाल ऑल टाइम सुखी
भेटली तर पा रो नाहीतर चंद्र मुखी
शेवटी पा रो आणि चंद्र मुखी कोणीच कायमची नसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

एकच कांन मंत्र पाळा मित्राणो
जय देवी जय देवी जय बायको
तू सांगेल ते ते मी आयको
जग म्हणेल काय बायकोचा चमचा आहे
सांगा जगाला तो प्रश्‍न आमचा आहे
शेवटी बायकोच आपल्याला आयुष्य भर सोसते
मित्राणो बायको फक्त आपलीच बायको चांगली असते 

गरज आहे आज मला.........

गरज आहे आज मला.........
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

गरज आहे आज मला...........
त्या  तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला..............
 त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि  मला..........
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या  जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे............. तुझी..........

आमच्या महाराजां बदद्ल आम्हाला काय विचारता






आमच्या महाराजां बदद्ल आम्हाला काय विचारता,
विचारायचे असेल तर विचारा
त्या सह्याद्रीच्या कड्याकपारींमध्ये वावरणारया वाघांना,
खनखनणारया तलवारींना,अरबी सागराला,मराठी रक्ताला ,
आणि पाणी पिताना ' शिवाजी ' दिसले

म्हणुन चार पावले मागे फिरणार्या मोगलांच्या घोड्यांना.
पोलादी मुठीत आजही हत्तीचे बळ आहे,
रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे,
डोळ्यातला निखारा आजही लाल आहे,
आडवे येऊ नका मराठ्यांमध्ये आजही
"शिवबा" तसाच आहे.

___________________________________________________________________________________________________

हिंदवी स्वराज्य संस्थापक , महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,जाणता राजा ,छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा .. जय भवानी जय शिवाजी









--






Tuesday 24 May 2011

लव्हॉलॉजीची एबीसीडी......


प्रेमाची एक वेगळी भाषा आणि संदर्भ असतात , हे प्रेमाच्या... टप्प्यावरून
गेल्यावरच समजतं. काहींच्या मते, ही भाषा डोळ्यांनी व्यक्त होऊन मनाला समजते,
तर काहींच्या मते, चेह-यावरील हावभाव पुरेसे असतात. प्रत्येकाची प्रेम व्यक्त
करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण तरीही जगभरातील प्रेमात काही गोष्टी कॉमन
असतात. तुम्ही कुणावर प्रेम केलं असेल तर थोडासा विचार करा. ही लव्हॉलॉजीची
एबीसीडी कळतनकळत तुम्हालाही परिचयाची झाली असेल.
'ए' : अँट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण
प्रेमाची सुरुवात त्याच्या / तिच्याकडे आकषिर्त झाल्यामुळे होते, हे वेगळं
सांगायची गरज आहे का.....?
'बी' : बॅचलर
ही डिग्री गमावून बसण्याच्या प्रक्रियेला प्रेमानेच तर सुरुवात होते. काहींच्या
आयुष्यात हा क्षण वारंवार येतो, तर काहींच्या आयुष्यात हा योग लग्नानंतरच येतो.
'सी' : क्यूट
तो / ती प्रत्येक क्षणी क्यूट वाटायला लागली की तुम्हाला प्रेमाचा फिवर चढलाच
समजा.
'डी' : डिच म्हणजेच फसवणं
प्रेमात कुणी दुस- याला डीच केलं तर त्या व्यक्तीने कधीच तिच्यावर प्रेम केलं
नव्हतं, असं समजावं.
'ई' : इगरनेस म्हणजेच तीव्र इच्छा
भेटणं, पाहणं, बोलणं अशा त्या दोघांच्या प्रत्येक हालचालीत प्रेमाची तीव्र
इच्छा दडलेली असते.
'एफ' : फ्लावर अर्थातच फुलं
प्रपोज करायचंय, राग घालवायचाय, खुश करायचंय, सरप्राइज द्यायचंय... तुम्हाला
काय करायचं, हा पेच पडला की छानशी फुलं विकत घ्यायची. अर्धा प्रॉब्लेम तिथेच
सोडवता येतो.
'जी' : गिफ्ट
हल्ली गिफ्ट हे प्रेम मोजण्याचं उत्तम परिमाण झालं आहे. त्यातील दिखाऊपणाचा भाग
वगळला तर हा प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला पर्याय होऊ शकतो.
'एच' : हॉट
फिलिंग हॉट, हॉट, हॉट..... प्रेमातील एक हॉट फिलिंग काही काळानंतर
पर्सनॅलिटीमधूनही दिसून येतं. त्याला / तिला आवडेल म्हणून खूप छान म्हणजे
आजच्या भाषेत हॉट दिसण्याचा प्रयत्न केला जातो.
'आय' : इलू
'सौदागर' चित्रपटाने काय दिलं, असं विचारलं तर इतका कठीण प्रश्न का विचारता,
असा प्रतिप्रश्न विचारला जाईल. 'आय लव्ह यू' चा शॉटफॉर्म यातून प्रसिद्ध झाला.
आज एसएमएस करताना या शॉर्ट आणि स्वीट शब्दाचा वापर केला जातो.
'जे' : जेलस म्हणजेच मत्सर
तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल, यावरून जेलसीची तीव्रता लक्षात येते.
प्रेमात पडल्यावर आपल्या मनात मत्सर भावना दडली आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत
नाही.
'के' : किस्स
कधीही न विसरता येणारे ते नाजूक क्षण, हवासा वाटणारा मउ सुत ओठांचा स्पर्श.
'एल' : लव्ह म्हणजेच प्रेम
लव्हॉलॉजी विषयाचा पाया याच संकल्पनेने रचला गेला आहे. जगातील संपूर्ण
साहित्यात याची परिपूर्ण व्याख्या मिळणं कठीण, यावरून या शब्दाची व्याप्ती
तुम्हाला कळू शकते.
'एम' : मनी म्हणजेच पैसा
प्रेमाने पोट भरत नाही, हे कळण्याचा टप्पा आणि त्यावरचं उत्तर म्हणजे पैसा.
'एन' : नॉटी म्हणजेच खोडकर
माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे-... हे खूपचं बोअरिंग वाटतं ना....? इथेच या
नात्यात थट्टा-मस्करीचा प्रवेश होतो. पण हे जरा जपून.
'ओ' : ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी
उम्मीद पर ही दुनिया कायम है..... असं प्रेमात पडल्यावर वारंवार बोलावं लागतं.
ती आपला निर्णय घरी कळवते, तुम्ही पहिल्यांदा तिच्या घरी जाता असा प्रसंग वेगळा
असतो, पण मदतीला येणारा आशावाद तोच असतो .
'पी' : फिजिक्स
हल्ली फिजिकल केमिस्ट्री, गेटिंग फिजिकल असे शब्द वापरले जातात. शारीरिक आकर्षण
हे त्याचं मूळ आहे. पण हा मुद्दा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
'क्यू': क्वीन
तिला कायम राणीसारखं मानावं लागतं. तिच्या कोणत्याही इच्छेचा अवमान केलेला चालत
नाही. शेवटी तिला तुमच्या हृदयाचं सम्राज्ञीपद द्यावंच लागतं, प्रेमातील ही एक
अपरिहार्य गोष्ट आहे.
'आर' : रोमान्स म्हणजेच अद्भुत किंवा रम्य अनुभव
रोमॅण्टिक व्यक्तींना त्यांच्या नातेसंबंधात प्रेमाचे रम्य रंग भरण्यासाठी खास
प्रयत्न करावे लागत नाही, तर काहींच्या आयुष्यात नियोजन करूनही असं रोमॅण्टिक
घडत नाही. लक फॅक्टर इथे मोठी भूमिका बजावतो.
'एस' : स्वीट
प्रेमात पडल्यावर प्रत्येक गोष्टीला स्वीट हा शब्द जोडायला विसरायचं नाही.
प्रेमात हार्ट, ड्रीम्स हे सगळं न सांगता स्वीट होऊन जातं.
'टी' : टॉलरन्स म्हणजेच सहनशक्ती
प्रेम आणि सहनशक्ती असे एकाच नाण्याचे दोन पैलू असतात, हे अनुभवावरून लक्षात
येईल. इथे तुम्ही कळत नकळत दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारलेली असते.
त्यामुळे जितकी सहनशक्ती तुमच्याकडे जास्त तितका प्रेमाची गोडी अधिक वाढते.
'यू' : 'US' म्हणजेच आम्ही
प्रेम निव्वळ स्वत:चा विचार करणारी संकुचित विचारसरणी सोडायला भाग पाडतं. हीच
प्रेमाची जादू असेल.
'व्ही' : व्हीक्टरी म्हणजेच जिंकणं
तिचं / त्याचं हृदय जिंकणं.... हे तुम्ही हृदय हरल्याशिवाय शक्य होत नाही. हा
अजब व्यवहार इथे आवडीने करावा लागतो.
'डब्ल्यू' : विल म्हणजेच इच्छाशक्ती
प्रेमात खूप काही सिद्ध करून दाखवावं लागतं . त्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी
तुम्हाला इच्छाशक्तीतून मिळते.
'एक्स' : एक्स (ex) - बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्ड
हे अक्षर आधीच्या प्रेमातील नात्यांचं वर्णन करताना मदतीला धावून येतं.
'वाय' : यंग
तुम्ही यंग हार्ट असाल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेमात पडण्याचं दिव्य
करता येतं.
'झेड' : झील म्हणजेच आस्था
तो दूर का असेना, पण सुखात असावा. ती कुठेही राहो, खूष राहावी. ही आस्थाच त्या
प्रेमवेड्या दोन जीवांना जपत असते.See More
कोणी तरी बोललेच आहे "प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं same असतं"....

मुलगी आणि तिचे चार मित्र - नितीकथा


 एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला
हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची
राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती
तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान
असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.
तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप
प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी
संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन
त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग
सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत
असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.
एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप
कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे
भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू
होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक
प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप
काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ
करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले.
आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू
गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे
आणि मालमत्तेचे रक्षण केलेस...  यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना
माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.
... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी
येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी,
दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
 मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून
गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले
पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही
जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या
मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
 सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष
होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते.
शेवटपर्यंत आपली साथ करते.

!..प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ..!


प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ...!!१!!
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ,
दोन हृदयाचा फक्त तालमेल,
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ....!
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!२!!
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ,
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा  मेळ,
ती नाराजी ओळखन्याची खेळ,
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ,
सारा सारा फक्त भावनांचा खेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!३!!
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!

अगदी असंच काही नाही मित्रा की ती माझी सखी व्हायला हवी


त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी
--

तुझ्या मनाला येईल ते कर!


वडील : माझा मुलगा मी सांगितलेलं सगळं तंतोतंत ऐकतो!
मित्र : व्वा! कसं काय?
...........................>..................
........................
.........................
वडील : मी त्याला सांगितलंय, तुझ्या मनाला येईल ते कर!

मीटर


रिक्षावाला : सॉरी साहेब, मी मीटर टाकायला विसरलो.
................................
..........................
...........................
..........................
.......................
गंपू : अरे जाऊ दे, मीसुद्धा माझं पाकीट आणायला विसरलोय.

दशमुखी रावण

एकदा रावणाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि तो श्रीरामांना माफी मागायचे
ठरून अयोद्ध्येला जातो. प्रभुरामाच्या महालाचा दरवाझा ठोठावतो.
श्रीराम दारवाझा उघडतात.
पण रावण काही न बोलता विचार करत उभा राहतो…
कसला विचार बरे ?
-
-
-
-
-
कुठल्या तोंडाने माफी मागू ? 

एक्सेल


कॉम्प्युटरची परीक्षा सुरू असते.
परीक्षक : मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय?
........................................
.....................
..........................
........................
विद्याथीर् : मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार, ज्याचा
वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो!!!

संताचा इंटरव्ह्यू


एकदा संता इंटरव्ह्यूला जातो.
मॅनेजर : चल सांग, फोर्ड म्हणजे काय?
संता : सर, फोर्ड ही एक चारचाकी गाडी आहे.
मॅनेजर : वा...मग आता सांग ऑक्सफोर्ड काय आहे?
संता : सोप्पंय...बैलगाडी. ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी..

गंपू गंमत


शिक्षक : गंपू, तुला उशीर का झाला?
गंपू : रस्त्यात लिहिलेल्या एका पाटीमुळे मला उशीर झाला?
शिक्षक : कोणती पाटी?
गंपू : पुढे शाळा आहे... हळू जा.

लई भारी रे एक नंबर डायलॉग


एक मुलगा देवाला विचारतो,
'तिला गुलाबाचं फूल का आवडतं??
ते तर एका दिवसात मरून जातं.
मग तिला मी का आवडत नाही?
...............
.............
मी तर तिच्यासाठी रोज
मरत असतो..
..........................
.........................
..............................
..........
...' देव उत्तर देता,
......................................... 'लई भारी रे.................
........................
...........
एक नंबर डायलॉग!!'

How To Add and Enable Marathi Languages in Windows



How To Add and Enable Marathi Languages in Windows


Windows 2000


To add an Marathi language in Windows 2000, follow these
steps:
  1. Click Start add-Marathi-language-win-2000, point to Settings, and then click Control Panel.
  2. Double-click Regional Settings.
  3. Click the General tab, click to select the check box next to the Marathi
    language group you wish to install, and then click Apply. The system will either prompt for a Windows 2000 CD-ROM or
    access the system files across the network. Once the Marathi language is installed,
    Windows 2000 will prompt you to restart the computer.


To enable a newly added Marathi language and specify a Marathi keyboard
layout in Windows 2000, follow these steps:
  1. Click Start add-Marathi-language-win-2000, point to Settings, and then click Control Panel.
  2. Double-click Regional Settings.
  3. Click the Input Locales tab.
  4. In the Input Locales box, click Marathi language, and then click Properties.
  5. In the Keyboard Layout box, click the Marathi keyboard layout, click OK, and then click OK.

Internet Explorer Administration Kit (IEAK)


The Marathi language support for text display and text input
can be included when you create an IEAK package for Microsoft Windows 98,
Microsoft Windows Millennium Edition, and Windows NT clients. This occurs in
"Stage 2 - Automatic Version Synchronization" of the IEAK Customization
Wizard.




Windows XP


To install Marathi language and Marathi keyboard layout in Windows XP,
follow these steps:
  1. In the Windows XP standard Start menu, click Start add-Marathi-language-xp, and then click Control Panel.



    In the Windows XP classic Start menu, click Start add-Marathi-language-xp, click Settings, and then click Control Panel.
  2. Double-click Regional and Language
    Options
    .
  3. Click the Languages tab, and then click Details under "Text Services and Input Languages".
  4. Click Add under "Installed Services", and then click Marathi language and the Marathi keyboard layout you want to use for that language.
  5. To configure the settings for the Language bar, click Language Bar under "Preferences".



Windows Vista

1. Open Regional and Language Options by clicking the Start button add-Marathi-language-vista, clicking Control Panel, clicking Clock, Language, and Region, and then clicking Regional and Language Options.
2. Click the Keyboards and Languages tab, and then click Change keyboards.
3. Under Installed services, click Add.
4. Double-click Marathi language, double-click the text services you want to add, select the text services options you want to add, and then click OK .






दिनूचे बिल

दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे
पुष्कळसे लोक येत. कोणी तपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत. कोणी
म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा." तर कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं
बिल किती झालं ते सांगा."
दिनू एका लहानश्या खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या
बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे
त्याला अजून कळले नव्हते.

दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"

डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात
बिल. वाच!"

दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं -

रोग्याला तपासण्याबद्दल ... १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल ... २० रुपये
आठ वेळा औषधांबद्दल ... ८ रुपये
_________________________

एकूण ... ३८ रुपये

दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय वाटले
कोणास ठाऊक? काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू आपल्या
खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्या आईच्या नावावर एक बिल तयार केले.
त्याच्यावर लिहिलं होतं -

आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये
शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे
__________________________________

एकूण ... ४ रुपये

ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी लवकर
उठला. त्याच्या उशाशी ४ रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात तेथे
ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरी लिहिलेले होते. त्याने कागद
उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केले होते.

लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही
गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही
_________________________________________________

एकूण ... काही नाही.

दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद
गळून पडला. ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला
पैसे परत केले, व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला.

आईने दिनूला कुरवाळले. आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली,

"तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"

     आचार्य अत्रे

आठवण तुझी....


आठवण तुझी येतच नव्हती
कारण तू येणारच होतास, माझ्यासाठी
आठवण तुझी येतच होती
कारण तू येणार होतास, जाण्यासाठी
का असा छळतोस मला?
हवे असताना तू, टाळतोस मला?
भेट तुझी-माझी होणारच आहे
कारण मी 'तुझ्यासाठी' येणारच आहे
कळत कसे नाही तुला?
तुझ्या शिवाय अर्थ नाही मला....
स्पर्श तुझा जाणवत राहतो
कळतच नाही कि, तो भास असतो
कसली हि आतुरता? कशासाठी आसुसलेपणा?
असतोस तू जवळ, तरीही अधुरेपणा....
घटत काळोखात मिटून जावसं वाटतं
तुझ्या मिठीत भरून राहावंस वाटतं
भुकेले ओठ, तहानलेली नजर,
आता थोडी तरी किव कर
हे सगळं तुला कवितेतलं वाटतंय?
पण कधीपासून असं मनात सलतंय
पापण्या मिटल्यावर तूच असतोस
उघडल्यावर, पापण्या संगे वेडी आस असते
येशील? दूर? जिथे हे सगळं संपणार असेल?
असा अंत खरंच आपल्याला मिळेल?
बोलना, काहीतरी बोल! खोल-खोल!
का तुझे डोळे, नि माझ्या भावना अबोल?
भावनांना डोळ्यांतून वाटा करून दे,
तू माझा माझ्यासाठी राहू दे....!
तू माझा माझ्यासाठी राहू दे....!
आभार - लेखक / कवी
submitted by: - बाळकृष्णा

Monday 23 May 2011

मी फक्त तुझ्यावरचप्रेम केले आहे

मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....
स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत
फिरताना.....
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....
अंतर नेहमी वाढत जाते ......
मी कधीही तुला विचारुन प्रेम केले
नाही....
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत
नाही.....
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......
आज आशा वाटेवर मी उभा आहे ..
समोर काहीच दिसत नाही ...
पण मागे फिरावे की नाही ..
हे ही समजत नाही .....
पण या वाटेवर चालत राहण्याचा ...
मी प्रयत्न करेन ....
तुझ्या सोबत न रहता , तुझ्या
मानत राहण्याचा प्रयत्न करेन ....
मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....
यात आकर्षणाचा भाग नाही ..
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...
माझे जीवन तुला कधीच विसरणार
नाही....
चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ..
पण येणारा जन्म हा फक्त
माझ्या साठी राखून ठेव.....
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ..
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे ....
WithWith RegardsRegards
PankajPankaj

मेरे मुर्गे को प्यारहुवा है रे चाचा

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
खाता नही पिता नही
बंद पडलीय त्याची वाचा
अब मै क्या करू उसको?
नही डाक्टर दिखानेको
तेरे आंगनमे वो जाताय
कुकुचकु कुकुचकु वो वरडताय
मेरा दानापानी नही उसको भाता
अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
देख हळुहळु तो कसा भागताय
लई उदास उदास दिखताय
चोच उघडी रखके तो बसतोय
नही फडफड फडफड करताय
अब्बी तुच हैरे बाबा उसका दाता
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मै क्या बोलतोय अब तू ध्यानसे सुन चाचा
ये मुर्गा और तेरी मुर्गीपे प्रसंग आयेलाय
बाका
अरे दोनो का भिड गया आपसमें टाका
अंधेरेमे जाके घेती एकमेकका मुका
ये प्रेमीयोंके बीचमे आता कोनी येवू नका
अबी दोनोके शादीका टैम आयेला है बरका
मेरे मुर्गे को प्यार हुवा है रे चाचा

प्रेमात पडल्यावर त्याग लागतो

प्रेमासाठी रसीक व्हावं लागतं
कामुक नजर चालत नाही
प्रेमात पडल्यावर त्याग लागतो
हट्ट धरून चालत नाही....
कधी आंसू कधी हसू दया पण
Filmyहोउन चालत नाही
खा-या जीवनात आपल्या Filmला
Happy-end रोजच मिळत नाही
फुलं प्रेमपत्र खड्ड्यात घाला
माणसापेक्षा ते मोठे नाही
पत्रांना काय कोणीही जपेल
नाते जपणे सोपे नाही
रुसवा फुगावा मनीच ठेवावा
नेहमीच डाळ काही शिजत नाही
जीव-जीव्हाळा लावावा
जीव देउन चालत नाही... जीव देउन चालत
नाही ....

मी फ़क्त प्रेम केलहोत

केल होत मी प्रेम .....
तुझ्या गोड हसण्यावर,
तुझ्या शांत स्वभावावर,
तुझ्या डोळ्यांवर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या मंजुळ बोलण्यावर,
तुझ्या डोळ्यांतील बोलाकेपनावर,
तुझ्या निरागस स्वभावावर,
तुझ्या तेवढ्याच शांत मनावर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या त्या रागावान्यावर,
रागाने लाल झालेल्या त्या गालांवर,
नाक मुरद्न्यावर,
गाल फुगवून बसन्यावर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या ईश्श म्हनन्यावर,
तुझ्या लाजन्यावर,
तुझ्या नजरेवर,
तुझ्या गुलाबी गालांवर,
केल होत मी प्रेम .....
प्रेम करताना विचार नाही केला,
तू होकार देशील का,
तू माझी होशील का,
या नीरस आयुष्यात नंदनवन फुलेल का,
मी फ़क्त प्रेम केल होत ......

बाप्पा चे दान

|| बाप्पा||
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला
वाटला ,
दोन क्षण दम खातो
म्हणून माझ्याघरी टेकला ,
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही
सापडला ,
मी
म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला
,
तू पण ना देवा कुठल्या जगात रा
हतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरा
वरून फ़िरतोस ,
मर्सिडिस नाही निदान नॅनो
तरी घेऊन टाक,
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टा
क,
इतक्या मागण्या पुरवताना
जीव माझा जातो ,
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जी
व दमतो ,
काय करू आता
सार मॅनेज होत नाही ,
पुर्वीसारखी
थोडक्यात माणसं खुशही
होत नाहीत,
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने स
िस्टीम झालीये हॅंग ,
तरीदेखील संपतच नाही भक्तांची
रांग ,
चार आठ आणे मोदक देऊन काय काय म
ागतात,
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या व
ाढतच जातात,
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन,
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल स
ोल्यूशन ,
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाही
स का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी
ऐकल नाहीस कारे ?
असं कर बाप्पा
, एक लॅपटॉप घेउन टाक,
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टी
व्हिटी देऊन टाक,
म्हणजे बसल्याजागी
काम होइल धावपळ नको,
परत येउन मला दमलो म्हणायला
नको,
माझ्या साऱ्या युक्त्यांनी
बाप्प झाला खुश,
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो
बक्षिस,
सी ई ओ ची
पोझिशन, टाऊनहाऊस ची
ओनरशिप,
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप.
मी हसलो
उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं .
म्हणालामागून तर बघ, बोल तुला
काय हवं.
'पारिजातकाच्या
सड्यात हरवलेलं अंगण हवं ',
'सोडून जाता येणार नाही
अस एक बंधन हवं',
'हवा आहे परत माणसातला
हरवलेला भाव',
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्या
त थोडासा शिरकाव ',
'देशील आणून परत माझी
हरवलेली नाती ',
'नेशील मला
परत जिथे आहे माझी माती ',
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं स
ंस्कृतीचं लेणं ',
'आईबापाचं कधीही
न फ़िटणारं देणं ',
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढो
लताशांचा गजर ',
'भांडणारा असला तरी
चालेल पण हवा आहे शेजार ',
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला
थोडं आयुष्याचं भान',
देशील का रे बाप्पा माझ्या पदरा
त एवढं दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही
, सोंडेमागून नुसता हसला .
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी
रहा" म्हणाला

मी दु:खी आहे असचंबोलणार

नुकतास मी
नदीवर जाऊन आलो
डोळ्यात साठलेलं एक तळं
अगदी थेंब थेंब पिळून आलो
वेळ होती ती किर्र रात्रीची
तरी नदीला भरती आली
तिलाच कळले नाही
कोणाची वेदना वरती आली
बांध तोडून काठाचा
ती गावभर फिरू लागली
माझा शोध घेण्यासाठी
हरेक घरात शिरू लागली
तिला ही पहायचं होते
कोणाचे इतके दु:खी घर होते
मीही नित्य मिसळते सागराशी
पण कुठे त्याची पातळी वर येते
माझ्या घरापाशी ती येताच
एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला
मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी
माझा गळलेला थेंब जुळाला
ओळखलं तिने मला
जागच्या जागी ती स्तब्द झाली
नजर माझ्याशी मिळताचं
स्व:तास म्हणू लागली अभागी
म्हणाली,
आजवर माझा समज होता
जगातली सर्वात दु:खी मीच आहे
पण, तुझ्याशी मापल्यावर कळलं
माझे दु:ख किती कमीच आहे
रोज स्व:तास बुडवते सागरात
पण कधी कुठे फरक पडला
तू एकदाच दु:ख जाहीर केलसं
माझ्या अंतकर्णातून पूर आला
मी म्हणालो.....
आपल्याहून सुखी जणांकडे पाहीलं
की आपणास आपण दु:खी वाटतो
आपल्याहून दु:खी जणांकडे पाहण्याचा
आपण प्रयत्नच कुठे करतो
जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही
तोपर्यंत हे असचं चालणार
सुख-समाधानात नांदणाराही
मी दु:खी आहे असचं बोलणार

कॉफीची चव

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर
होती ती. साहजिकच तिच्या मागे
खुपजण होते. ती सुंदर होती,
बुध्दिमानही होती. सर्वांनाच
हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच
जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या
'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे
मित्रही भाव देत नव्हते. मग
तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या
अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही
नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात
मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून,
सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी
प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं
फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले
नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं
आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो'
म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि
त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या
शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-
यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर
दिली. पण काय बोलायचं, हे त्याला
सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं
तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि
याला हो म्हटलं, असंही मनात आलं
तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर
अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला
हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं
टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला
, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत
टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या
अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु
लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि
देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा
अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ
कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ
लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी
विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये
चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच
"पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी
काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..."
शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत
असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची,
तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि
खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं
बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता
आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं
घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर
आहे. खारटलेल्या कॉफीनं मला
लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती
चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..."
भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या
निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं
मन. मग तीही बोलली... आपल्या
दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल...
तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान
डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला
जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता.
हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि
लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु
झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं
आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी
सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि
हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ
जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर
मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली,
ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला,
तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे
व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा
सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट
आवरायला घेतलं असताना तिला त्यात
एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या
दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली
होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर!
आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत
खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे
एकच असत्य मी तुझ्याशी बोललो...
पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही
खंत मला जाचत राहिली. पण मी कधी
तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो
नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील
आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी
पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये
घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!
त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो
होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ
मागितलं वेटरकडे. आणि मग त्या
विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं
म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती
विचित्र चव ती! पण मला तु खुप
आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन
आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत
राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य
उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं
ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला
माफ करशील?"