Thursday 7 July 2011

नजरेत जे सामर्थ्य आहे

नजरेत जे सामर्थ्य आहे 

ते शब्दांना कसे कळणार ? 

पण प्रेमात पडल्याशिवाय 

ते तुम्हाला कसे कळणार ?

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा

काहीतरी देण्यात महत्त्व असतं

कारण मागीतेला स्वार्थ

अन् दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधीतरी माझी चौकशी केली होती

मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती ....v

आज अचानक भल्या पहाटे

"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकले
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकले

प्रेमाचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या क्षणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या क्षणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

पहिल्या पावसाची पहिली सर.....

पहिल्या पावसाची पहिली सर.....    

आता नुकतीच बरसली पहिल्या पावसाची पहिली सर
तुझ्या आठवणींचा स्पर्श हळुवार जाणवला अंगभर.....

पावसात भिजलेले क्षण आज पुन्हा डोळ्यात साठले
डोळ्यातल्या आसवांनी धावत पुन्हा आठवणींना गाठले.....

पावसासवे तुझ्या आठवणीही डोळ्यात बरसत राहिल्या
पावसाच्या पाण्याबरोबर त्याही नकळत गालावर धावल्या.....

माझ्या दु:खातही पाऊस आनंदाचे क्षण घेऊन कोसळला
विखुरलेल्या मनाला सावरत जुन्या आठवणीत मिसळला......

पावसाच्या सरी झेलत व्याकूळ मन भूतकाळात रमले
सुखद आठवणींना उजाळा देत दु:खही माझे क्षमले.....

पुन्हा एकदा हिरवळली मनात आठवणींची पाऊल वाट
पहिल्या पावसातल्या क्षणांची ओंजळ भरली काठोकाठ .....

ढगांकडे पाहत मी पावसाच्या सरी झेलत राहिलो
डोळ्यातले अश्रू लपवत बेभान होऊन भिजत राहिलो.....

आई गं...आई गं

आई गं...आई गं...... बछड्यासाठी धाव गं....... तुरुंगात मी माणसांच्या, घे मजकडे तु धाव गं....... खेळण्यास मी आलो होतो, हिरव्या गवता येथ भुलुनी.... मान पकडली या लोकांनी, हिरवा पाला मज दावुनी....... आण कुणा मज सोडविण्या, ओरड्तोय मी फ़ार फ़ार गं...... बुभुक्षित हे मानव जमले, करण्या मजला ठार गं....... आई...आई...ये ना गं, मम्मे..खम्मे....ये ना लवकर सांग ना कसायास या, बघ बांधतो खुंट्यास कसा...... बाळ तुझा चिमुकला आज, बघ धडपडतोय आज असा........ कोवळ्या बाळास खाण्या, जमाव अगदी निर्लज्ज आहे....... खवखवलेला सुरा कधीचा, कापण्यास कसा सज्ज आहे....... आई नको वाचवुस मजला, बस्स पाहीन तुला अखेरी...... दादास पण सांगुच नको, अंत असा माझा अघोरी....... आताच तर आलो ना गं. मग बोलावतो देव का गं........ मारल्या हाका जेथुनी मी, कापणार ही मान का गं....... आई...आई ये गं....ये गं, तो जवळ माझ्या येतोय..... आतातरी सोडव ना गं मला, तो प्राण हिरावुन नेतोय........ मम्मी.....आई......आई.....आई, दाबली ही मान माझी...... डोळ्यात तुला आठवतोय गं...... आ..... ---संतोष

लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...
समाजाचं अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं.
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

कायदा सुव्यवस्थेला, कुणी भीत नाही राजे,
सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया, बहिणी, लेकी, सुना, पवित्र राहिली नाहीत नाती,
शासन करणाऱ्या तलवारीचीच गंजून गेलीयेत पाती.

आपल्या आब्रूचे लक्तर, आब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

हिंदवी स्वराज्य स्थापन करून, तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्र प्रेमच स्फुल्लिंग करून, तुम्ही निघून गेलात राजे,
पण... या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर, स्वताचीच पोळी भाजणाऱ्या...
आणि आमचीच मतं घेऊन, शेवटी सत्तेने माजणाऱ्या.

गल्लीबोळातल्या पुढाऱ्याला, "रयतेचा राजा" म्हणावं लागतं,
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,
भारतीयांचं काय पाणी, ते भारतात राहून बघून गेले,
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर, आता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,
महाराष्ट्रीय तुतारीच्या नावाखाली, इथे इंग्रजीचीच पिपाणी वाजतीये.

माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ज्यांच्याकडे पैसा आहे, त्याचं जगणं झालाय मस्त,
नी पोटासाठी राबनाऱ्याच, इथं मरण झालाय स्वस्त,
किड्यामुंग्यासारखी इथं, जगताहेत मानसं,
दिवसाढवळ्या, आपलं मरण बघतायेत मानसं.

वेदना असह्य होतात, म्हणून इच्छा मरण मागावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

तुमच्या सारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही,
पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही.
घराघरातल्या जिजाऊ आता, करियर वूमन होत आहेत,
संस्कार करण्या ऐवजी पोराला, पाळणाघरात देत आहेत.

कुत्र आई नी पोरगं दाई कडे असलेलं बघावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

आता एक करा राजे, या पुढे प्रेरणा कोणाला देऊ नका,
अन कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका..
काय सांगू राजे, आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही,
नी तुमच्या आदर्शाच ओझ, इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही.

कर्तव्य विसरून आमची तरुणाई, आपल्याच मस्तीत मग्न आहे,
घराघरातील मूर्ती तुमची, मनामनात भग्न आहे.

तुमच्या जयंतीला राजे, वर्षातून दोन वेळा नाचावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

अन्याय, अत्याचार, अधर्मावर, इथल्या माणसाचं जीवापाड प्रेम जडलंय,
आणि हिंदू पतपातशाहीवर राजे,दहशतवादच सावट पडलंय.
बॉम्बस्फोटाच्या भीतीने, वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मातृभूमीत राजे, मोकळा श्वासही घेता येत नाही.

गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोशांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

स्वराज्य इथ आहे राजे, पण सुराज्याचा पत्ता नाही,
म्हणतात ना... कौरव सारे माजले आहे आणि पांडवानाच सत्ता नाही
विरोध करण्याची हिम्मत जाऊन, निष्क्रीयताच पक्की मुरली आहे,
माझीही तलावर बोथट झालीये, आता फक्त शब्दांनाच धार उरली आहे.

समाजपरिवर्तनाच चक्र इथं, दुबळ्या हातांनाच फिरवावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

ताठ मानेनं जगावं म्हटलं, तर राजे, आपलीच मानसं जगू देत नाहीत,
आणि भ्रष्टाचारमुक्त, अखंड भारतच स्वप्न बघू देत नाहीत.
आता हीच निष्क्रिय मानसं, माझा सर्वस्व लुटतील,
आणि तुमच्यावर कविता लिहिली म्हणून माझ्या जीवावर उठतील.

तरी बरं तुमचंच रक्त वाहतंय, माझ्या नसानसामधनं म्हणून लिहावं लागतं
नी लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...

जातील राजे, नक्की जातील, "हे हि दिवस" एकदिवस,
स्वताच्या चुकांची जाणीव होयील, प्रत्येकालाच एकदिवस.

मात्र त्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न हवेत करायला,
बुडणाऱ्याला काडीशिवाय, दुसरं काय लागतं तरायला?

पुन्हा एकदा त्याच डौलानं, भगवा झेंडा फडकणार,
कुणाच्याही चिथावणीने, आमची माथी नाही भडकणार.

आता आम्ही विचार करू, रायते साठी कष्ट करू,
समाज बदलण्यासाठी राजे, स्वतापासून सुरुवात करू.

तुमचेच वारस आम्ही राजे, फक्त रक्त उसळाव लागतं
हा समाज बदलण्यासाठीच राजे, या जगात जगावं लागतं...

                                                                                मुळ कवी- पुष्कर घाटपांडे

"माझ्यावर कविता कर ना"

ती नेहमीच म्हणायची "माझ्यावर कविता कर ना",
मला तेव्हा कळायचे नाही नक्की काय आणि कशी कविता करू ते.कारण आमची मैत्री ही फेसबुक मधली त्यामुळे फक्त सेलवर जे बोलणे होयचे तेव्हडेच मी तिला ओळखत होतो.
तिला सारखा मी सांगायचो " कविता करू कशी, अशी होत नाही कविता त्यासाठी तुला पूर्ण जाणून घेयला हवे".
ती म्हणायची "माझा फोटो पाहून कर ना तेव्हा तर जमेल ना"

मी म्हणायचो " कशी होणार ग फोटोत तुझा नेहमी एकाच भाव असतो प्रसन्न, त्याशिवाय दुसरा काही अर्थ लागत नाही फोटो पाहून "
मी म्हणालो "एकदा भेट आपण खूप गप्पा मारू मग नक्कीच होईल कविता ".
मग ठरल्या प्रमाणे आम्ही एके दिवशी भेटलो चांगल्या २-१ तास गप्पा मारल्या.
तेव्हा तिचे निरीक्षण केले तिला काय आवडते, काय नाही, तिचे बोलणे, तिचे हसणे, तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी, तिचे ध्येय सगळे सगळे.
तिचा निरोप घेतल्यानंतर काही क्षणात सगळे शब्द जुळून आले आणि ही कविता जन्माला आली.
या कवितेला नाव काय द्यावे हे मात्र अजून कळले नाही..

माझी कागदाची होडी....

आज सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी....
भर पावसात होती,
हेलकावे घेत थोडी.....

पाणी आहे सारे सारे,
थेंब गार गार सारे....
कसे गोठवत आहे,
झोंबणारे न्यारे वारे....

माझ्या राहत्या घराला,
सारा पाण्याचा गराडा....
पण दुर गेला फ़ार,
पुर्‍या अंगाचा उकाडा....

सारी जमलेली पोरं,
पाण्यामध्ये चिंब चिंब...
वर पाहुन आभाळी,
मुखी टिपलेले थेंब...

भिजणारी झाडे होते,
उभी तिथंच निमुट....
पानं पानं होती मग्न,
सुखस्वप्नांचीच लुट....

सारी गल्ली सुनीसुनी,
फ़क्त पोरांचा घोळका...
पावसाच्या सरीमध्ये,
सुरु स्वच्छंद गलका.....

तो बरसावा म्हणुन,
मी केली लाडीगोडी......
फ़ार सुटली वेगाने,
माझी कागदाची होडी......

सखी

सखी -
जणू ती मला भेटली, आणि मी पूर्ण बदलूनच गेलो,

दुपारपर्यंत झोपणारा मी, तिला भेटण्यासाठी लवकर उठू लागलो.

...



रोज कट्यावर बसणारा मी, तिच्यामुळे वर्गात बसू लागलो,

कट्यावर बसून टपोरीगिरी करणारा मी, वर्गात लेक्चर ऐकू लागलो.





कॉलेजला बाईकवर जाणारा मी, तिच्यासाठी बसने जावू लागलो,

स्पाईक केलेल्या माझ्या त्या केसांचा, आता भांग पाडू लागलो.





तिच्यामुळे जीन्स टीशर्ट सोडून, फोर्मल्स घालू लागलो,

देवावरील तिच्या श्रद्धेमुळे, भक्तीगीतेही ऐकू लागलो.





तिला सिनेमा आवडत नाही, म्हणून नाटक पाहू लागलो,

मध्यांतरात पोपकॉर्ण नाही, तर कुल्फी घेऊ लागलो.





प्रत्येक रविवारी तिच्यामुळे आता, समुद्रावर जावू लागलो,

कधीच न खाल्लेले ते चने किनाऱ्यावर तिच्याबरोबर खाऊ लागलो.





इतकी वर्ष टपोरी दिसणारा मी, आज रुपेरी दिसत होतो,

बाबांकडून ही न बदललेला मी, आज तिच्यामुळे पूर्ण बदललो होतो.





हे सारे ऐकल्यावर तुम्हाला, वाटली असेल गम्मत,

पण तिची माझ्या आयुष्यात, खूप आहे किंमत.





अहो, ती मला भेटली, अन मोठी जादूच झाली, तिच्या सहवासात एक चांगली गोष्ट घडली,

ती कधीही, मला भेटायला बोलवायची, अन त्याच भीतीमुळे, माझी (सि***ची) वाईट सवय सुटली.





आज मला कळाले की मुली धोकाच नाही तर, प्रेम ही करतात,

माझ्या सारख्यांना वाईट मार्गावरून, एका चांगल्या मार्गावरही आणतात.





आज या निसर्गाला हात जोडून प्रार्थना केली,

माझ्यासारखा प्रत्येकजण बदलेल, पण प्रत्येकाला 'ही' नाही, हिच्यासारखी जर का सखी भेटली.

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले

मूळ कविता : मेघ नसता वीज नसता
मूळ कवी : संदीप खरे


मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले
जाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले!
(रस्ता रोडरोलरला म्हणतो)
जाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा?
तू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले!
एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा?
मुंगळेही डांबरावर भार वाटू लागले
लाख रस्ते मारण्याचे, यम तरीही हळहळे
सापळे सारे कसे एकाच शहरी लावले!
चालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा
तेच ते ड्रेनेज उघडे बघ सुगंधू लागले...
भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
खोदती रात्री तुला जे, भय तयांचे वाटले

"मित्रमराठी"~ आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?

लहान असताना आयुष्य कसं, आनंदाने भरलेलं असतं
मोठे होईपर्यंत त्याचं गमक, आपल्याला मुळी कळत नसतं
हळू हळू शाळा संपते, कॉलेज ची वाट मोकळी होते
जमिनीवर चालता चालता, जिंदगी आपल्याला हवेत नेते
हळूच डोकावणाय्रा अक्कलदाढेचं, कौतुक आमचं संपत नसतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
कॉलेज संपतं, आम्ही नोकरी शोधतो
त्यानंतर  छोकरी पाहून, एका नव्या बंधनात अडकतो
आईच्या हाती बनलेलं जेवण, दोन वेळा आम्हाला हवं असतं
रात्री बायकोच्या कुशीत शिरून, गाढ झोपून जायचं असतं
आपल्या माणसांच्या सहवासात, सगळं आयुष्य घालवायचं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
दिवसांवर दिवसांच्या राशी, प्रश्न नवे दर दिवशी
जगात काय चाल्लंय? माझा काय घेणं त्याच्याशी?
दुनियेच्या राजकारणात आम्हाला, अजिबात पडायचं नसतं
सामाजिक प्रश्न; आणीबाणी, याशी आमचं काही नातं नसतं
आम्ही आमच्या लहान विश्वात, आमचं सुख शोधलेलं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
असच आयुष्य पुढे सरकतं, मुलाबाळांनी घर फुलतं
नव्या जबाबदाय्रांमध्ये आम्ही, पुरते अडकून बसतो
त्याचं बालपण त्याचं शिक्षण, ह्यातच आम्ही हरवून जातो
दर वर्षी सुट्टीत एकदा, महाबळेश्वर ला फिरून येतो
त्या क्षणांच्या आठवणींवर आमचं, पूर्ण वर्ष सुखात जातं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
हळू हळू  जगता जगता, आमचं वय दिसू लागतं
सगळं आयुष्य मग, मुलांच्या खांद्यावर विसावतं
"सांभाळून घेतील आपल्याला", असा कायम समज असतो.
आणि आयुष्याच्या ह्या लढाईत मात्र, आम्ही बहुतेक हरलेले असतो
थोडासा आधार आणि नातवंडांचं, भरघोस प्रेम हवं असतं
आमच्यासारख्यांना जगण्यासाठी आणखी काय हवं असत?
आयुष्याचा अंत जवळ येतो, आपण जुन्या आठवणी शोधू लागतो
काही मागे राहायला नको, सगळे क्षण आठवत राहतो
तीच तर शिदोरी असते, जाताना मनात साठवून न्यायची
बहुतेक पूर्तता झालेली असते, आमच्या बय्राच  इच्छांची
समाधानाचे अनंत श्वास, आपण अशा वेळी उपभोगत असतो
आणि आमच्यासारख्यांना मरण्यासाठीही आणखी कुठे काय हवं असतं?????

Saturday 25 June 2011

आमचे ’ हे ’ रात्री अस्स्स्स्से घोरतात..


चोरी,दरोडे पडतात शेजारच्या घरी
आमच्या घरापासून चोर लांबच राहतात
अहो,पहारेकरी नाही काही दारी
आमचे हेच चोरांना पळवून लावतात

हत्यारांविना ते अशी करामत करतात
काहीच न करता , घरा उपयोगी पडतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

जसे तोफांतून दारुगोळे सुसाट सुटतात
की चोर जीव घेऊन पळतच सुटतात
पळतच सुटतात हो धुम्म पळत सुटतात
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

रातराणी फुलते मागच्या अंगणी
चंद्र चांदण्यांचे झिम्मा फुगडी गुंजतात
अहो,छळायला नसतं कुणी एकांती
आमचे हेच युध्दाची तुतारी फुंकतात

चढत्या रातींची नशा उतरवतात
काहीच न करता , मला उपयोगी नसतात..

सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात

अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..

वैदूचे अंगारे,डॉक्टरचे फवारे सारेच फसतात
सारेच फसतात हो सारे उपायच फसतात

आमचे हे रात्री अस्स्स्से घोरतात
घोरतच राहतात हो घोरतच राहतात......

घर्र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र र्रर्र र्र घुर्र र्र र्रघुर्र्घुर्र्घुर्
 

Friday 24 June 2011

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.......


-- 

संवाद

संवाद

टाळते आताशा मी वाट अंधाराची
नकोशी आता मज साथ चांदण्यांची ...

उगाच फाडते मी पान आठवणींची
जाळते उगाच मज याद आसवांची ...

दूर सारते मी वाट हि धुक्याची
मोकळीक हवी मज श्वास घेण्याची ...

सांडली मी झोळी अनमोल आठवांची
उरलीत मजजवळ वेदना बोचणाऱ्या काट्यांची ...

गाळली काही मी कडवी अबोल शब्दांची
करू देत मज जरा संवाद माझ्याच मनाशी ...

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

दुखवले कितीही तिने

तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,

कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

म्हणूनच नाही मिळाले परत तरी

निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते,

तूच माझी निशब्द कविता

तूच माझी निशब्द कविता.

हा पाऊस हा गारवा,
सर्वाना पसंत सारा.
त्यावर तुझे लाजने,
जसा फुलांचा वसंत सारा.


गुलाबी ओठातुन निघालेला,
शब्द तुझा,नवा पाखरू जसा.
हाय तुझे ते मधहोश डोळे,
सांग,मला मी सावरू कसा.

रस्त्यावरी रडणार्याला पाहून,
लगेच रडणारी पुण्यवान तू.
स्वतहाच्या विश्वात हरवलेली,
मानूसकित जशी बंदिवान तू.

टिकली कपाळावरची,
जशे चांदणे,डोळ्यात तुझ्या
सार्‍याच प्रश्नांची उत्तरे.
सुरेख कल्पना तू देवाची,
तुझ्यपासूनच ती सुंदराता,
तू म्हणजेच ” प्रेम खरे”.

तूच विश्व,
नि तूच प्राणिता.
निशब्द हा देव तुझ्यविणा,
तूच माझी निशब्द कविता.

खरच का ग आई

खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे………

प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी………

तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन…..

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे……..


देता असता आला तर
माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन,
अणि पुढचा जन्म घेई पर्यंत
तुमच्या मनामधे रहिन….

खरच आई …….

एक कॉल दिवसाला, ग्रहण लागले प्रेमाला...

एक कॉल सकाळी,
एक कॉल दुपारी...
सायंकाळच्या कॉलला,
उद्या बोलायची तयारी...

मध्ये मध्ये मेसेजचा,
खुप भडिमार होता....
आपली मनं जुळली तेव्हा,
आठवणींचा सुकाळ होता...

हळुहळु करता करता,
तीनचे कॉल दोन झाले...
लव्ह मेसेजचे रुपांतर,
कॉमेडीमध्येच झाले.....

एक कॉल दिवसाला,
ग्रहण लागले प्रेमाला...
आता तुझे मेसेजही,
लागले अक्कल शिकवायला...

आधी तुला करमत नव्हतं,
बोलल्यावाचुन रहावत नव्हतं....
नुसता मिस कॉल देणं,
तुझ्यासाठी किती सोपं होतं...

आता वेळ आणीबाणीची,
दिवसभरात कॉल नसतो....
एक फ़ालतु मेसेजसाठी,
दिवसभर ताटकळत बसतो...

जुन्या काळची आठवण आली,
करताना आज न्याहारी.....
सायंकाळच्या त्या कॉलला,
उद्या बोलायची तयारी...

आईला सांग कॉम्प्लान दे

लहानगा गंपू जंगलात फिरत असतो. 
तेवढ्यात त्याला एक साप झाडाला लटकत असलेला दिसतो. 
गंपू त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, 
'अशाने उंची नाही वाढत.... 
आईला सांग कॉम्प्लान दे!!' 

मिस्ड कॉल [विनोद]

गंपूला एक जण सारखा सारखा मिस्ड कॉल देऊन त्रास देत असतो . 
कंटाळून गंपू सिमकार्ड बदलतो 
णि 
त्याला एसएमएस करतो , 


' मी ते सिमकार्ड बंद केलं ....
 आता कसा मला मिस्ड कॉल देशील ??' 

नवरा-बायको चे भान्डण


नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. 


बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. 


नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं? 


बायको : नाही तर काय? 


नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो. 

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन...

दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
पान पान आर्त आणि........ पान पान आर्त आणि ...झाड बावरुन ||धॄ||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन.
 सांजवेळी, जेव्हा येई, आठव आठव,
हो.....सांजवेळी, जेव्हा येई, आठव आठव,
दूर कुठे मंदिरात होई घंटारव,
उभा अंगावर राही, काटा सरसरुन ||१||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन.. हो..... पाखरु होऊन.

हो.....नकळत आठवणी, जसे विसरले,
नकळत आठवणी, जसे विसरले,
वाटेवर येते तसे ....ठसे उमटले,
दूर वेडेपिसे सूर ...सनई भरुन ||२||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन ..हो..... पाखरु होऊन.

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा,
हो....झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा,
आता जरी आला इथे, ऋतु वसंताचा,
ऋतु हा सुखाचा इथला ..गेला ओसरुन ||३||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन..
दिस चार झाले मन ..हो..... पाखरु होऊन.
पान पान आर्त आणि........ पान पान आर्त आणि ...झाड बावरुन ||धॄ||
दिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन,
दिस चार झाले मन, हो............. पाखरु होऊन.


गीतः सौमित्र / किशोर कदम.
संगीत: अशोक पत्की.
गायिका: साधना सरगम.
चित्रपटः आई शप्पथ (२००६).

Monday 13 June 2011

कोर्टातील उलटतपासणी [विनोद]


कोर्टातील अशीच एक उलटतपासणी. 


वकील : तुमच्या नोकराचं वय काय आहे? 


साक्षीदार : पंधरा ते वीस वर्षे असावे. मला नेमकं माहीत नाही.


वकील : तो तुमच्याकडं किती वर्षापासून राहतो आहे? 


साक्षीदार : गेल्या पंचवीस वर्षांपासून! 

Sunday 12 June 2011

इलेक्टेशिअनचा विनोद

एका बाईने गंपू इलेक्टेशिअनला डोअर बेल दुरुस्त करायला बोलावलं. 
परंतु, 
गंपू चार दिवस त्यांच्या घरी गेलाच नाही.
अखेर त्या बाईंनी कंटाळून पुन्हा गंपूला फोन केला. 
गंपू वैतागून म्हणाला, 
'अहो बाई, चार दिवस तुमच्या घरी येतोय.
पण शंभरदा बेल वाजवूनही तुम्ही दरवाजा उघडत नाही म्हणजे काय?'

Friday 10 June 2011

’जिन’का बच्चा

जत्रेत घोषणा होत असते.
' एक बच्चा खो गया है .
 जिनका है , लेके जाए .' 


गंपू तिकडे जातो आणि म्हणतो, 
 ' मला पण दाखवा ... 
देखू तो 
जिन’का 
बच्चा कैसा होता है !!' . 

सफरचंदचे गणित

प्रश्न : एका पिशवीत तीन सफरचंदं होती .
 त्यात आणखी दोन सफरचंदं ठेवली तर काय होईल ? 


उत्तर : तिसरीच्या गणित विषयासाठी एक प्रश्न !!!

भुतचा थरथराट [विनोद]

एक भूत मध्यरात्री १२ वाजता दुसऱ्या भुताला म्हणालं, 
उगाच थरथर कापू नकोस. 
वेड्यासारखं घाबरू नकोस.
 हे सगळे मनाचे खेळ असतात. 
नीकां नीकां सं गा काही तं. 

एवढं मोठं घर माझं [विनोद]

नंदू : अरे, माझं घर इतकं मोठं आहे की एखादी लोकल ट्रेन त्यात सहज फिरु शकते. 


चंदू : ह्यॅ...हे तर काहीच नाही. माझं घर एवढं मोठं आहे की एका कोपऱ्यातून दुसरीकडे फोन करायचा झाल्यास रोमिंग चार्ज लागतो. 

Wednesday 1 June 2011

प्रेम माझे तू आहेस

प्रेम माझे तू आहेस ,
प्रेयसी ही तूच आहेस ,
साथ माझी तू आहेस ,
वेड माझे तूच आहेस ...

तूच माझे बोल ,
माझी कविता तूच आहेस ,
तूच माझे शब्द ,
वाक्य माझे तूच आहेस ...

रात्र माझी तू आहेस ,
दिवस माझा तू आहेस ,
तूच इन्द्रधनुष्य माझा ,
पावसातही तूच आहेस ...

देव माझा तू आहेस ,
धर्म देखिल तूच आहेस ,
भाव माझे तू आहेस ,
भवनांतही तूच आहेस ..

Tuesday 31 May 2011

आठवते का तुला?

आपली नवीन ओळख झाली होती
फोनवर तासन् तास गप्पांची साथ होती......
आठवते का तुला?
आपण पहिल्यांदा भेटायचे ठरवले
एकमेकांना पहिल्यांदा पहायचे ठरवले......

आठवते का तुला?
आपलं पहिल्यांदा समुद्रकिनारी भेटणं
एकमेकांची नजर चुकवुन एकमेकांना न्याहाळणं......
आठवते का तुला?
माझ्या मनातलं गुपित मी सांगितलं
तू पण प्रेम करतेस माझ्यवर हे जाणवले......
आठवते का तुला?



त्यानंतरचं आपलं वारंवार भेटणं
थोड्याशाही विरहाने आपलं अगतिक होणं
किती स्वप्नवत होते ते दिवस
सदा तुझ्याच विचारांत असे हे मन
आज तू ही तूच आहेस
आणि मी ही मीच आहे
माझ प्रेम ही अगदी तसंच आहे
किंबहुना ते तू विसरली असशील
आज आपल्यामध्ये काहीही नसेल


शरीराने दूर असली तरी मनाने आहे जवळ
चूक तुझीही नाही, करियरचा चिंताच तुंबळ
खुप समजावलं वेड्या मनाला, सर्व परत नीट होईल
वेळात वेळ काढून, ती तुला भेटायला येइल
मनाला आवर घालणं नाही ग जमत मला
सारखं रागावून त्रास नसतो द्यायचा तुला
समजून घे ग मला.....
वाटेकडे डोळे लावून तुझ्या
विचारांत असतो फक्त तुझ्या
प्रत्यक्षात नाही जमलं तर
स्वप्नांत तरी येशील ना माझ्या?

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
काल तिच्या सोबत चालत होतो...
चालता चालता बोलत होतो...
बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

नविन बुटामुले पाय दुखत होता...
चालता चालता हाडाला खुपत होता...
तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!


काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली
आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी....
का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

होटेलात गेलो.......खुप खल्ल
उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलं
का तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........
घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....
बसस्टॉप येताच मी थाम्ब्लो
तेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिले

काही क्षण स्तब्ध झालो........आम्ही
एकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालो
कोणास ठाउक........का ते कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

-- 

Sunday 29 May 2011

शून्यातही तुला विसरणारा मी नाही

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही


थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले


जीवनाच्या मॆफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले.........


तुझ्याच त्या स्मितहास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते.....
साकारलेल्या त्या भावनांना
का आज शब्दच नाहीत??
का आज त्या डोळ्यांमध्ये
माझी एक ओळखही नाही


-- 

महाराष्ट्र दर्शन

नाशिक
नाशिक देवळांचे शहर 


स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणजे नाशिक. हे शहर देवळांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक काळापासून नाशिकला धार्मिक स्थळ म्हणून महात्म्य प्राप्त झाले आहे. 

देशात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी दक्षिण भारतात नाशिक व त्र्यंबकेश्वर ही ठिकाणे आहेत.दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट पाहण्यासारखे आहेत. 

येथील प्रसिध्द ठिकाणे- ‍

1. त्र्यंबकेश्वर 



हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात ते वसले आहे. मुख्य ज्योतिर्लिंगाचे मंदिर पहाण्यासारखे आहे. त्याच्या चारही बाजूंनी कोट आहे. पूर्वेला मुख्या दरवाजा आहे. ब्रम्हा, विष्णू व महेशाची तीन लिंगे हे येथील वैशिष्ट्य आहे. 

मंदिराजवळच कुशावर्त तीर्थ हे कुंड आहे. मंदिरालालागूनच अहिल्या नदी वाहते. ब्रम्हगिरी पर्वतावरच गंगाद्वार हे ठिकाण आहे. येथे गोदावरी उगम पावते. त्याच्यावर ब्रम्हगिरीला जाण्याचा रस्ता आहे. तेथे भगवान शंकरांनी जटा आपटल्याच्या खूणा असल्याचे सांगितले जाते. 

कुशावर्त तीर्थ  कुंड


त्र्यंबकेश्वर वारकरी भक्तांसाठीही महत्त्वाचे टिकाण आहे. कारण ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथांना येथेच गहिनीनातांचा अनुग्रह झाला होता. त्यांची समाधीही येथेच आहे. तेथे मोठा उत्सवही साजरा होतो. शिवाय कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या तेरा पैकी दहा आखाड्यांचे आश्रम येथे आहेत. 






त्र्यंबकेश्वरात बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी तर लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारण्याची परंपरा आहे. विशेषतः तिसर्‍या सोमवारी त्यासाठी मोठी गर्दी असते. हे स्थळ नाशिकपासून २७ किलोमीटरवर आहे.

2. पंचवटी- 







त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली गोदावरी नदी नाशिकमधून वाहते. या नदीमुळे नाशिकचे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पलिकडील भागाला पंचवटी म्हणतात. पंचवटी भागातच रामाचे वास्तव् होते असे मानले जाते. येथे असलेल्या पाच वडांच्या झाडांवरून या भागाचे नाव पंचवटी पडले. 


प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटीतच आहे. याशिवाय इतर अनेक मंदिरे येथे आहेत. पंचवटीतच सीता गुंफा आहे. या गुहेत सीता काही काळ राहिली होती, असे म्हणतात. गुहेत जायला फार छोटा रस्ता आहे. आतमध्ये राम लक्ष्मण व सीतेची मूर्ती आहे. येथूनच रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे मानले जाते.

३. रामकुंड- 

रामकुंड

पंचवटीतील हे सर्वात महत्वाचे ठिकाण. पंचवटीतील वास्तव्यात श्रीराम स्नानासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी पिता दशरथाच्या अस्थींचे विसर्जन रामाने केले. येथे अस्थिविलय कुंड आहे. तेथे विसर्जित केलेल्या अस्थी वाहून न जाता वितळतात, अशी श्रद्धा आहे. जवळच गांधी तलाव आहे. या तलाव तसेच स्मारक आहे. महात्मा गांधीच्या अस्थी येथे विसर्जित केल्या हो्त्या. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नान याच कुंडात होत असते.

४. काळाराम व इतर मंदिरे 

पेशव्यांच्य काळात त्यांचे सरदार रंगवराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बनले आहे. त्याच्याभोवती दगडी कोट असून तो १७ फूट उंच आहे. मंदिरात आत ओवर्‍या आहेत. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिरात राम सीता व लक्ष्मण यांच्या २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. 

हे मंदिर बांधण्यास १७७८ साली सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी जवळच्या रामशेज डोंगरावरून काळा दगड आणण्यात आला. हे मंदिर बांधायला तेवीस लाख रूपये खर्च आला होता. दोन हजार कामगार बारा वर्षे काम करत होते. दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. 

तो बरीच वर्षे चालला होता. काळारामाव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेली मंदिरे या परिसरात आहेत. आकर्षक कलाकुसरीसाठी नारोशंकर मंदिर प्रसिद्ध आहे. पेशव्यांनी वसईच्या युद्धात विजय मिळाल्यानंतर काढून आणलेली घंटा याच मंदिरात बसवली आहे. याशिवाय नंदी नसलेली कपालेश्वर मंदिर आहे. प्राचीन सुंदरनारायण मंदिर आहे. 

५. तपोवन

पंचवटीतच गोदावरी व नंदिनी या नद्यांच्या संगमावर तपोवन हे ठिकाण आहे. तपोवन म्हणजे तप करण्याची जागा. पूर्वीच्या काळी या भागात दोन नद्यांच्या संगमामुळे हिरवळ होती. अतिशय प्रसन्न व मनोहारी वातावरणात साधू तपश्चर्येसाठी येथे येत असत. 

रामायणकाळात लक्ष्मण येथे येत असे. त्याने शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग येथे घडला असे मानले जाते. या भागात काही गुहासुद्धा आहेत. नैसर्गिक सौंदर्यामुळे आजही पर्यटकांची येथे गर्दी असते. येथे हनुमान व लक्ष्मण यांची मंदिरेही आहेत. 

6. अंजनेरी 

हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अंजनेरी नाशिकपासून २० किलोमीटरवर आहे. या पर्वतावर जैनांची लेणीसुद्धा आहेत. गिर्यारोहणासाठी येथे असलेले सुळके प्रसिद्ध आहेत. गिर्यारोहक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच हे ठिकाण आहे. मंदिर डोंगरावर आहे. 

7. वणी- 

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथील जगदंबा देवी आहे. सप्तश्रंृग डोंगरावर हे स्थान आहे. डोंगरावर गेल्यानंतर तेथून नऊशे पायर्‍या चढून गेल्यानंर देवळात जाता येते. डोंगरातच देवीची मूर्ती कोरलेली आहे. अठराभूजा असलेली मूर्ती देखणी आहे. नवरात्र व चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. 

ही देवी अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळे या काळात मोठी गर्दी असते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येथे भक्त येतात. अनेक भक्त आपल्या गावापासून कावडी भरून आणतात. हे ठिकाण नाशिकपासून ५२.२७ किलोमीटरवर आहे. 

8.बौद्धलेणी 

नाशिक मुंबई रस्त्यावर नाशिकपासून आठ किलोमीटरवर बौद्धलेणी आहेत. (ज्याला स्थानिक भाषेत पांडवलेणी म्हणतात.) पहिल्या वा दुसर्‍या शतकात ती बांधली असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धविहार बांधण्यात आले आहे. 

9.फाळके स्मारक- 

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके नाशिकचेच. नाशिकमध्येच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे देखणे स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारण्यात आले आहे. 

१०. जिल्ह्यातील स्थळे 

नाशिकपासून तीस किलोमीटरवर असलेल्या सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. येवला हे शहर पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय १८५७च्या युद्धात पराक्रम गाजविणारे तात्या टोपे येवल्याचेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी त्याच धर्मात मरणार नाही ही घोषणा येवला येथेच केली. 

मालेगावजवळील झोडगे येथील गावी असलेले शिवमंदिर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरीजवळील टाकेद हे ठिकाण पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. सीतेला पळवून नेणार्‍या रावणाशी युद्ध करून याच ठिकाणी जटायू पक्षी निपचित पडला होता. त्याच्या स्मृत्यर्थ येथे जटायू मंदिरही आहे. 

इगतपुरी येथे सत्यनारायण गोयंका यांनी उभारलेले विपश्यना केंद्र आहे. तेथे जगभरातून लोक येतात. चांदवड येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत अनेक गिर्यारोहणासाठी योग्य अशी ठिकाणे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नाशिकहून घोटीमार्गे जाण्यास जवळ आहे. शिवाय राज्यातील सर्वांत उच्च किल्ला म्हणून गणला जाणारा साल्हेरचा किल्लाही जिल्ह्यातच आहे.

जाण्याचा मार्ग ः 
 
नाशिकला राज्यातील सर्व शहरातून येण्यास बस आहेत. शिवाय नाशिक रेल्वेमार्गावरही आहे. पुण्यापासून नाशिक २१० तर मुंबईपासून २३० किलोमीटर आहे.पंचवटी हे नाशिक शहरातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेले एक धार्मिक स्थान असून हे स्‍थळ गादावरी या नदीच्‍या काठावर आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा, रामकुंड, पेशवे यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे कोरीव दगडात कलाकुसर असलेले स्‍थळ पाहण्‍यासारखे आहे.
Posted by कैलास बधान at 8:13 PM 0 comments
Labels: महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे
महाराष्ट्रातील अभयारण्ये
अभयारण्य    जिल्हा

कर्नाळा (पक्षी)    रायगड

माळठोक (पक्षी)    अहमदनगर

मेळघाट (वाघ)    अमरावती

भीमाशंकर (शेकरू खार)    पुणे

सागरेश्वर (हरिण)    सांगली

चपराळा    गडचिरोली

नांदूरमधमेश्वर (पक्षी)    नाशिक

देऊळगाव रेहकुरी (काळवीट)    अहमदनगर

राधानगरी (गवे)    कोल्हापूर

टिपेश्वर (मोर)    यवतमाळ

काटेपूर्णा    अकोला

अनेर    धुळे
Posted by कैलास बधान at 7:49 PM 0 comments
Labels: महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्याने    ठिकाण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान    बोरिवली व ठाणे

पेंच राष्ट्रीय उद्यान    नागपूर

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान    गोंदिया

ताडोबा राष्ट्रीय उद्यान    चंद्रपूर

गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट)    अमरावती

चांदोली राष्ट्रीय उद्यान    सांगली, सातारा,

कोल्हापूर, रत्नागिरी
 महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
थंड हवेची ठिकाणे    जिल्हा

चिखलदरा    अमरावती

म्हैसमाळ    औरंगाबाद

पन्हाळा    कोल्हापूर

रामटेक    नागपूर

माथेरान    रायगड

महाबळेश्वर, पाचगणी    सातारा

तोरणमळ    धुळे

लोणावळा, खंडाळा    पुणे 

माहिती


टॅक्स
·  इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाइन कसे भरावे
·  संपत्ती कर कुठे भरावा

उद्योग-व्यवसाय सुरु करण्याविषयी
कुठे आणि कसा अर्ज करावा
·  मतदार यादीत नाव कसे दाखल करावे
·  म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा
·  रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी
·  RTI अंतर्गत माहिती कशी मिळवावी
·  कॉपीराइट साठी अर्ज
·  शस्त्र परवाना कुठून मिळवावा
·  पेटंटसाठी कुठे अर्ज करावा
तक्रारः कुठे आणि कशी दाखल करावी
शोध घ्या/पत्ता मिळवा
·  रेल्वे तिकीटची PNR स्थिती
·  पासपोर्ट अर्जाची स्थिती
·  महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे
·  संसदेचे अधिनियम
·  महाराष्ट्रातील ऑनलाइन जिल्हे
·  कृषी हवामान
·  बाळासाठी पोषक आहार
·  भारत सरकारच्या टेंडर्सविषयी
·  इंडियन एअरलाइन्स विमानांचे वेळापत्रक
·  प्रौढांसाठी पोषक आहार
·  आयुर्वेद/योग/निसर्गोपचाराविषयीमाहिती
·  न्यायालयात दाखल प्रकरणांची सद्दस्थिती
·  शरीरातील मेद
·  चोरी गेलेल्या गाड्यांची स्थिती
·  ISD Codes कसे शोधाल
·  मराठी साहित्य